Unordered List

LightBlog

Saturday, 6 January 2018

स्वराज्याची चौथी राजधानी अजिंक्यतारा .....

             अजिंक्यतारा
अजिंक्यतारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे.


अजिंक्यतारा/सातारचा किल्ला/सप्तर्षीचा किल्ला/मंगळाईचा किल्ला/शाहूगड/सतारे इ. नावाने चर्चेत होता.

सातारा गावातून दिसणारा अजिंक्यतारा  



नाव-अजिंक्यतारा
उंची-  समुद्रसपाटी पासून 3200 फुट.
          शहरापासून 900 फुट.
लांबी-  पुर्व-पश्चिम - 3300 फुट.
           दक्षिण-उत्तर - 1800 फुट.
प्रकार-गिरिदुर्गचढाईची
श्रेणी-सोपी
ठिकाण-सातारा, महाराष्ट्रजवळचे गावसाताराडोंगररांगसातारा ,बामणोली 
सध्याची अवस्था-व्यवस्थित




स्थापना{{{स्थापना}}}
प्रतापगडापासून फुटणार्‍या बामणोली रांगेवर अजिंक्‍यतारा उभारलेला आहे. अजिंक्‍यतार्‍याची शहरापासुन उंची साधारणत: 900 फुट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार 1800 फुट आहे. आज या किल्ल्यावर वृक्षारोपणासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात.


कसे जाल ?
अजिंक्‍यतारा किल्ला सातारा शहरातच असल्याने शहरातून अनेक वाटांनी गडावर जाता येते. सातारा एस.टी.स्थानकावरून अदालत वाड्यामार्गे जाणार्‍या कोणत्याही गाडीने अदालत वाड्यापाशी उतरून किल्ल्यावर जाता येते. सातारा ते राजवाडा अशी बससेवा दर १०-१५ मिनिटाला उपलब्ध आहे. ’राजवाडा’ बस स्थानकापासून अदालत वाड्यापर्यंत चालत येण्यास १० मिनिटे लागतात. अदालत वाड्याच्या बाजूने असलेल्ली वाट गडावर जाणार्‍या गाडी रस्त्याला लागते. व त्या रस्त्याने १ कि.मी. चालत गेल्यावर माणूस गडाच्या दरवाज्यापाशी पोहचतो. अजिंक्‍यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी थेट गाडी रस्तासुद्धा आहे. कोणत्याही मार्गाने गड गाठण्यास साधारण १ तास लागतो. गडावर पहाटे चढून जाणे प्रकृती च्या दृष्टी ने चांगले आहे





इतिहास
सातारचा किल्ला (अजिंक्‍यतारा) म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्‍यतारा. सातार्‍याचा किल्ला हा कोल्हापूरच्या शिलाहार वंशातल्या दुसर्‍या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला.इ.स.1200 मध्ये देवगिरीच्या यादवांनी जिंकुन घेतला इ.स.1200-1300 पर्यंत यादवांकडेच होता.खिलजी सुलतानने कपट आणि फितुरीने देवगिरीचे राज्य हस्तगत केले.पुढे हा किल्ला इ.स.1347-इ.स.1347-1498 बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्याआदिलशहाकडे गेला. इ.स.१५79 मध्ये पहिल्या आदिलशहाची पत्‍नी चांदबिबी येथे कैदेत होती. मुधोजी राजे नाईक/निंबाळकर यांना इ.स.1640 पर्यंत कैद करण्यात आले.इ.स.1659 साली महाराजांकडे आला.पुरंदर तहात मुघलांना द्यावा लागला.इ.स.1666 विजापूरकरांनी ताबा मिळवला .इ.स.1673 पुन्हा स्वराज्यात ताबा आला.किल्ल्याच्या महादरवाजाजवळील पोस्टर वर आहे की,"जेजुरी प्रमाणेच अजिंक्यताऱ्यावर देखील शहाजी राजे आणि शिवाजी राजे यांची भेट झाली.त्यानंतर विजापूरच्या ताब्यात गेला.इ.स.11नोव्हेंबर 1675 ला छत्रपतींच्या ताब्यात आला.शिवाजी महारांजांच्या अंगी ज्वर आल्या कारणाने इ.स.1 डिसेंबर 1676-इ.स.25जानेवारी 1677 पर्यंत महाराजांचा याठिकाणी मुक्काम होता.  असे मध्ये शिवाजीच्याराज्याचा विस्तार होत असतांना २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली.इ.स.23मे 1698 साली राजाराम महाराजांनी साताऱ्याला राजधानी म्हणून घोषित केले.इ.स.2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचे निधन झाले.अजिमशहाने हल्ला चढवला.मोघलांनी फितुरीने केलेल्या हल्ल्यात 2000 लोक मरण पावले.इ.स.20 फेब्रुवारी 1707 साली शाहू महाराजांची मुघलांकडून सुटका झाली आणि इ.स.12 जानेवारी 1708 साली त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला.नंतरच्या कालखंडात गडांने रामराजे महाराज,आबासाहेब(दुसरे शाहू )महाराज,प्रतापसिंह महाराज यांचे राज्याभिषेक अनुभवले.दुसर्‍या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.


गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे





सातार्‍यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. आजही या दोन दरवाजांपैकी पहिला दरवाजा सुस्थितीत आहे. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. हे मंदिर राहण्यास उत्तम आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. पुढे गेल्यावर एक डावीकडे जाणारी वाट दिसते व 'मंगळादेवी मंदिराकडे' असे तिथे लिहिलेले आढळते. या वाटेत ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात. या वाटेने थेट तटबंदीच्या साह्याने पुढे जाणे म्हणजे गडाला प्रदक्षिणा घालण्यासारखेच आहे. गडाच्या उत्तरेलादेखील दोन दरवाजे आहेत. ते तटबंदीवरून प्रदक्षिणा मारतांना नजरेस पडतात. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते.एकूण 7 तळी,7 देवालय, 2 पीर आहेत.गडावर  दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. उन्हाळ्यात एकातही पाणी नसते. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.



तसेच दक्षिण दिशेला निनाम(पाङळी) हे गाव आहे. या गावात एक पुरातन (इ.स. १७००) मधील कोल्हापूरच्या (रत्‍नागिरीवाङी) जोतिबाचे देऊळ आहे. तसेच गावालगत ङोंगर आहे. तेथे पांडवगळ नावाचे एक पुराणकालीन प्रेक्षणीय स्थळ आहे व या गावाच्या पशिम दिशेला तलावआहे.
मनमोहक असे सूर्योदय आणि सूर्यास्त ...





संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणतः दीड तास लागतो.

2 comments: